शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला जतची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार : विलासराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 18:25 IST

आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीद्वारे लढविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोण कसे वागतो आणि काही भूमिका घेतो, यानंतर विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी पक्की

जत : आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीद्वारे लढविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोण कसे वागतो आणि काही भूमिका घेतो, यानंतर विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु जत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी आम्ही नेत्यांकडे करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी येथे दिली.

जत तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित लढवणार आहेत, हे निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय भूमिका घेतात, ते पाहून विधानसभा निवडणूक आघाडीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकत्रित आणि एक दिलाने काम करणार आहेत. त्यासंदर्भात जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत कार्यरत असणाऱ्या पदाधिकाºयांना आदेश देण्यात आले आहेत. पक्षाच्या बूथ कमिटीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

यावेळी प्रदेश संघटक ताजुद्दीन तांबोळी, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, पक्षनिरीक्षक राजू पाटील, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जत तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी, उत्तम चव्हाण, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, मीनाक्षी आक्की, सलीमा मुल्ला, शिवाजी शिंदे, विलास माने, मच्छिंद्र वाघमोडे, शंकरराव गायकवाड, फिरोज मुल्ला, जे. के. माळी, सिद्धू शिरसाट, किरण बिजरगी आदी उपस्थित होते.जलसंधारणाच्या कामाचा बोजवारा उडेल, म्हणूनच टँकर बंदजत तालुक्यात चारा व पाणीटंचाई आहे. जलसंधारणाच्या कामाचे जिल्'ाला बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे येथे टँकर सुरू करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. जलसंधारणाच्या कामाचा बोजवारा उडेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. साठवण तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून द्यावेत व येणारे वीज बिल आणि पाणीपट्टी टंचाई निधीतून भरावी, अशी मागणी विलासराव शिंदे यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस